Virat Kohli : विराटच्या वादळी खेळीने कुणाचा बाजार उठवला?

विराटने (Virat Kohli) टीम इंडिया (Team India) अडचणीत असताना निर्णायक क्षणी गिअर चेंज करत ही खेळी केली.   

Updated: Oct 25, 2022, 10:17 AM IST
Virat Kohli : विराटच्या वादळी खेळीने कुणाचा बाजार उठवला?  title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

मुंबई :  विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद 82 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकवर (IND vs PAK) 4 विकेट्सने मात केली. टीम इंडियाची 160 धावांचं पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. मात्र विराटने नेहमीप्रमाणे टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावत विजय मिळवून दिला. टीम इंडिया हरते की काय, आता हे जिंकत नाही, असा नाराजीचा सूर आवळत क्रिकेट चाहत्यांनी टीव्ही बंद केला. मात्र विराटने एक बाजू लावून धरत पाकिस्तानला पराभूत केलंच. (ind vs pak t 20 world cup 2022 online and offline shopping are stoped during to virat kohli batting in crusical moment against pakistan at mcg)

विराटने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी गिअर चेंज करत ही खेळी केली. सामना सुद्धा इतका रंगला होता की प्रत्येकाचं टीव्हीसमोरुन उठणं अशक्यच झालं होतं. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. दिवाळीनिमित्ताने अनेक जण ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंग करत होते. मात्र विराटच्या या खेळीने या सर्व शॉपिंगला ब्रेक लावला. प्रत्येक जण जमेल तसं सामना पाहण्यात रंगले होते. यामुळे खरेदी थांबली आणि व्यापारी धंद्याला लागले. 

यूपीआयचे व्यवहार थंडावले होते तर सोने खरेदीही थांबली होती. मॅच जिंकेपर्यंत अनेक दुकानांमध्ये व्यवहार थांबले होते. मॅच संपल्यानंतर मात्र ही खरेदी पुन्हा जोमात सुरु झाली.