या राशीच्या लोकांशी लग्न करणं म्हणजे स्वत: वर संकट ओढवून घेण्यासारखं?

या 5 राशींच्या लोकांसोबत विवाह करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण

Updated: Jan 18, 2022, 05:46 PM IST
या राशीच्या लोकांशी लग्न करणं म्हणजे स्वत: वर संकट ओढवून घेण्यासारखं?  title=

मुंबई : व्यक्ती तितक्या प्रकती असं म्हटलं जातं. माणसाचा स्वभाव त्याच्या राशीनुसार असतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल किंवा एखाद्या गोष्टीवर त्याची प्रतिक्रिया कशी असेल, हे त्याच्या राशीवर बरेच अवलंबून असतं असं म्हटलं जातं. 

लग्नाआधीही ज्योतिषाला कुंडली दाखवून योग्य मुलीचा किंवा मुलाचा शोध घेतला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीचे लोक खूप द्विधा मनस्थितीमध्ये असतात. ते नातं नीट सांभाळू शकत नाहीत. 12 राशींपैकी अशा 5 राशी आहेत ज्या कायमच गोंधळलेल्या असतात त्या राशीच्या लोकांबद्दल जाणून घेऊया. 

कुंभ - या राशीची लोक आपल्या पार्टनरशी जास्त कनेक्ट राहतात. त्यांना आपल्या पार्टनरला पहिलं प्राधान्य द्यावं असं कायम वाटत असतं. त्यामुळे नातं टिकवण्याचं कौशल्य या लोकांकडे असतं. मात्र काहीवेळा समोरचा व्यक्ती तसा नसेल तर त्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो. 
 
मेष - या राशीचे लोक खूप जास्त जिद्दी असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट ऐकण्यात रस असतो. या राशीच्या लोकांमध्ये संयमाची कमतरता असते. इतकेच नाही तर या राशीचे लोकही आपली चूक बरोबर सिद्ध करू लागतात. त्यामुळे ते जोडीदारासोबत जमत नाहीत.

मिथुन- या राशीच्या लोकांना प्रेम व्यक्त करायला आवडतं. त्यांना खूप बोलायचं असतं. जोडीदाराचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे नात्यात मिस कम्युनिकेशन होतं. नात्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

वृश्चिक - वृश्चिक राशीचे लोक खूप तापट असतात. त्याच वेळी, ते संशयास्पद मूडचे देखील असतात. एकदा राग चढला की मग इतरांसमोरही तो काढयला कमी करत नाहीत. त्यामुळे नात्यात कटुता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वृषभ - वृषभ राशीचे लोक हट्टी स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांचा हा स्वभाव नात्यासाठी धोकादायक ठरतो. कधी कधी ते आपल्या बोलण्यातून किंवा निर्णयातून समोरच्याला दुखावतात. 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)