'या' रेषा तळहातावर असतील तर लग्नानंतर बदलतं आयुष्य, तुम्ही देखील तपासून पाहा

 काही लोकांच्या हातातील लग्न रेषेची संख्या एकापेक्षाही जास्त असते. या रेषेवरील चिन्हे तुमचे वैवाहिक जीवन कसे जाईल हे सांगतात.

Updated: Feb 25, 2022, 04:13 PM IST
'या' रेषा तळहातावर असतील तर लग्नानंतर बदलतं आयुष्य, तुम्ही देखील तपासून पाहा title=

मुंबई : आपल्यापैकी बरेच लोकं लग्न ठरवण्यापूर्वी किंवा कोणतंही काम करताना ज्योतिषाकडे जातात आणि योग्य मुहूर्त आणि भविष्याबद्दल जाणून घेतात. हस्तरेषा शास्त्रात विवाह रेषाला खूप महत्व दिलं जातं कारण, त्यावरुनच बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलतं. हाताच्या करंगळीखाली बुध पर्वतावर तळहातातून बाहेर जाणार्‍या रेषेला विवाह रेषा म्हणतात. काही लोकांच्या हातातील लग्न रेषेची संख्या एकापेक्षाही जास्त असते. या रेषेवरील चिन्हे तुमचे वैवाहिक जीवन कसे जाईल हे सांगतात.

या लोकांचे लग्नानंतर भाग्य खुलते

सूर्य क्षेत्राकडे जाणाऱ्या विवाह रेषेच्या शेवटी नक्षत्र असेल, तर अशा लोकांचा विवाह उच्च कुटुंबात होतो. असे म्हणतात की, अशा लोकांचे नशीब लग्नानंतर उघडते. लाइफ पार्टनर मिळाल्यावर म्हणजेच लग्न झाल्यानंतर अशा लोकांचे नशीब चमकते आणि त्यांना भरपूर पैसा मिळतो.

या लोकांचे लग्नानंतर आयुष्य वाईट मार्गावर जाते.

एखाद्याच्या हातात विवाह रेषेवर क्रॉस असणे अशुभ मानले जाते. अशा खुणा तुमच्या जीवनात वियोग किंवा मृत्यू दर्शवतात. असे मानले जाते की, अशा चिन्ह असलेल्या व्यक्तीच्या जोडीदाराचा अकाली मृत्यू होऊ शकतो. विवाह रेषेला स्पर्श करताना, विवाह रेषेच्या वर क्रॉस चिन्ह असल्यास, हे दर्शविते की पत्नीला आयुष्यात गर्भपाताचा सामना करावा लागू शकतो.

जोडीदाराकडून वैवाहिक सुख मिळेल

जर एखाद्याच्या हातात विवाह रेषेच्या वर वर्गाचे चिन्ह असेल तर अशा लोकांना वैवाहिक सुख प्राप्त होते. हे चिन्ह सूचित करते की, आपल्या जीवनसाथीबरोबर सर्व काही ठीक चालले आहे आणि दोघांमध्ये चांगले ट्यूनिंग आहे.

जोडीदाराचा मृत्यू होऊ शकतो

विवाह रेषेवर काळे ठिपके असतील तर जीवन साथीदाराचा अपघाती मृत्यू होऊ शकतो असे मानले जाते. अशा लोकांनी घराबाहेर पडताना अतिशय काळजीपूर्वक प्रवास करावा. विशेषतः जेव्हा तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल किंवा बाईक चालवत असाल.

लग्न जवळच्या नात्यात होते

जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील विवाह रेषा एखाद्या बेटासारख्या चिन्हावर संपत असेल, तर असे मानले जाते की लग्न कुठेतरी ओळखीच्या किंवा जवळच्या नातेसंबंधात होईल. दुसरीकडे, विवाह रेषेच्या मध्यभागी एखाद्या बेटाचे चिन्ह असल्यास, हे दर्शविते की वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात.