अशी बोटं असलेले लोक असतात भाग्यवान, त्यांची आयुष्यात सहज होते प्रगती

तुम्हाला माहित आहे का की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात.

Updated: Jul 21, 2022, 07:54 PM IST
अशी बोटं असलेले लोक असतात भाग्यवान, त्यांची आयुष्यात सहज होते प्रगती title=

मुंबई : वास्तुशास्त्रात हस्तरेषाशास्त्राला खूप महत्वं दिलं जातं. हाताच्या रेषांमध्ये सर्व काही दडलेलं असतं. हस्तरेषाशास्त्रामुळे आपल्याला भविष्यातील अनेक गोष्टी जाणून घेता येतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात, चला तर मग जाणून घेऊया की, तुमच्या हाताची बोटं तुमच्याबद्दल काय सांगतात.

करंगळी

या बोटाला सर्वात लहान बोट असेही म्हणतात. हे बोट तुमची आर्थिक स्थिती आणि बुद्धिमत्तेची पातळी सांगते. हे बोट जितके लांब असेल तितकी व्यक्ती अधिक बुद्धिमान असेल. पण हे बोट वाकडी किंवा लहान असेल, तर त्या व्यक्तीला आयुष्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागते आणि कधी कधी हे लोक त्यांच्या निर्णयामुळे अडकतात.

अनामिका

याया बोटाने त्या व्यक्तीच्या भावना, आरोग्य आणि आयुष्यात किती कीर्ती  मिळवली आहे हे पाहिले जाते. हे बोट जास्त लांब असलेल्या माणसाला जास्त राग येतो आणि तो साहसी बनतो. जर हे बोट मध्यम आकाराचे असेल तर ते खूप चांगले आहे. जर हे बोट तर्जनीपेक्षा लांब असेल तर असे लोक आयुष्यात खूप नाव कमावतात.

मधले बोट

या बोटाने व्यक्तीची काम करण्याची क्षमता, शिक्षण, नोकरी पाहिली जाते. ते बोटाइतके लांब आणि सरळ असेल, तर तो व्यक्ती वेगाने करिअरमध्ये प्रगती करेल. पण जर हे बोट वाकडं किंवा अनामिकापेक्षा लहान असेल, तर अशा लोकांना करिअरमध्ये खूप संघर्ष करावा लागतो. या बोटावर तीळ असेल तर व्यक्तीला संकटांनी घेरले जाते.

तर्जनी

हे सर्वात शक्तिशाली बोट मानले जाते. या बोटाबाबत लोकांमध्ये अशी धारणा आहे की, हे बोट झाड, फळे, वनस्पती यांच्याकडे दाखवले तर झाडे, फळे, झाडे खराब होतात. या बोटाने ब्रश करणे देखील निषिद्ध आहे कारण या बोटात खूप शक्ती आहे, या बोटाने ब्रश केल्याने दातदुखी होऊ शकते.

हे बोट सांगते की एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या किती शक्तिशाली आहे. लोकांना योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे की, नाही हेही पाहिले जाते.

जर हे बोट सरळ आणि लांब असेल तर व्यक्तीची विशेष प्रगती दिसून येते. देवाची कृपा तुमच्यावर राहते. जर हे बोट अनामिकेच्या बरोबरीचे असेल तर ते लोक धूर्त, कपटी असतात, म्हणजेच हे लोक इतरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. या बोटात सोने आणि पितळ घातल्यास व्यक्ती विघ्नांपासून वाचते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)