Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा...

Mahashivratri 2023 Puja: आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना पूजेच्या थाळीत कोणत्या गोष्टी पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नको, याबद्दल जाणून घ्या... 

Updated: Feb 18, 2023, 08:02 AM IST
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा... title=
Mahashivratri 2023 Lord Mahadev had 8 children along with Ganapati and Kartikeya

Mahashivratri 2023: आज देशभरात आराध्य दैवत महादेवचा सण म्हणजे महाशिवरात्री (Mahashivratri 2023) साजरा होणार. आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला असे मानले जाते. या दिवशी व्रत, उपवास करून मनोभावे पूजा-अर्चा केल्याने आयुष्यातील समस्या दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. इतकेच नाही तर दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. या दिवशी भाविक महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न  करतात. श्री शंकराला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये भांग, बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण केली जातात. मात्र शास्रात अशा काही गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. ज्या भगवान शंकराची पूजा करताना वापरू नयेत. कारण तसे केले तर भगवान शंकर नाराज होऊ शकतात.  

 शिवपुराणानुसार शिवलिंगावर तुळशीची पाने, हळद, सिंदूर आणि कुमकुम कधीही अर्पण करू नये. त्यांना नारळ किंवा नारळ पाणीही आवडत नाही. म्हणूनच या गोष्टी विसरूनही महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023 Puja Thali Niyam)  अर्पण करण्याची चूक करू नका. असे केल्याने तुम्हाला अशुभ परिणामांना सामोरे जावे लागेल. 

वाचा: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? 'ही' त्यांची नावे; वाचा 

धार्मिक विद्वानांच्या मते, तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. ती भगवान विष्णूची पत्नी आहे. दुसरीकडे, नारळाला श्रीफळ म्हणतात आणि तिला लक्ष्मीचे रूप म्हटले जाते. सिंदूर आणि हळद हे गृहस्थांचे लक्षण मानले जाते, तर भगवान शिव हे शाश्वत तपस्वी आहेत. अशा स्थितीत जर आपण या वस्तू महादेवाला अर्पण केल्या तर भगवान शिव त्याचा कोप करू शकतात.

जर तुम्ही महाशिवरात्रीला  (Mahashivratri 2023 Puja Thali Niyam)  शिव मंदिरात जात असाल तर तुम्ही तुमच्या पूजेच्या ताटात धतुरा फळ, बद्री बेर, निबौली, केळी आणि सामान्य बेर ठेवू शकता. हे फळ अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या लोकांवर आशीर्वाद देतात. पूजेच्या ताटात बेलपत्र आणि भांग-धतुऱ्याची पाने देखील समाविष्ट करू शकता. असे केल्याने कुटुंबात आनंदाचा संचार होतो.