Baba Vanga Prediction: बाबा वेंगांच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी, येत्या काही महिन्यांत हे खरं होणार?

Baba Vanga: भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती. त्यापैकी 2 भाकिते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत आणि उरलेली भाकितेही येत्या काळात खरी ठरतील अशी भीती लोकांना वाटत आहे.

Updated: Oct 14, 2022, 12:54 PM IST
Baba Vanga Prediction: बाबा वेंगांच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी, येत्या काही महिन्यांत हे खरं होणार? title=

Baba Vanga Upcoming Predictions: जगभरा प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत 'भविष्यवक्ते' बाबा वेंगा पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आले आहेत. सन 2022 मध्ये आतापर्यंत बाबा वंगा (Baba Vanga Prediction 2022) ची 2 भविष्यवाणी खरी ठरली आहे, तर या वर्षासाठी त्यांनी एकूण 6 भाकिते केली होती, जी येत्या काही महिन्यांत खरी ठरू शकतात.

बाबा वेंगाचे हे 2 भाकित यावर्षी खरे ठरले

2022 या वर्षासाठी बाबा वनगा यांनी 6 भाकिते केली होती. त्यापैकी 2 आत्तापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यानंतर येत्या काळात इतर चार भाकितेही खरी ठरण्याची भीती लोकांना आहे. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये काही आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये पूर येण्याची भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली आहे. काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियात पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

तर पाकिस्तानमध्येही पुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. याचदरम्यान 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बाबा वेंगा यांनी काही शहरांमध्ये पाणीटंचाई आणि दुष्काळाचीही भविष्यवाणी केली होती. अलीकडच्या काळात पोर्तुगालला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले तर इटलीमध्ये दुष्काळाची समस्या उघड झाली.

आता लोकांच्या नजरा या चार अंदाजांवर लागल्या

सन 2022 मध्ये बाबा वांगा (Baba Vanga) यांनी कोरोना विषाणूनंतर एका नवीन प्राणघातक विषाणूची भविष्यवाणी केली होती. जी सायबेरियापासून सुरू होऊ शकते. दुष्काळासारखी परिस्थिती आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचीही भविष्यवाणी करण्यात आली होती.

वाचा : सोन्याचा भाव वाढूनही खरेदी जोरात, जाणून घ्या आजचे दर

येत्या काही महिन्यात हा धोका भारतात!

बाबा वांगाच्या भाकितांनुसार 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बाबा वेंगा म्हणाले होते की, सन 2022 मध्ये जगातील देशांमध्ये तापमानात घट होईल आणि त्यामुळे टिड्डिचा हल्ला वाढेल. ज्याचा भारतावर परिणाम होईल आणि त्यामुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.