नोबेल पुरस्कार विजेते भारतीय...

Oct 11, 2014, 21:17 PM IST
1/11

कैलाश सत्यार्थी


यंदाचा म्हणजेच, 2014 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आलाय. पाकिस्तानाची कार्यकर्ती मलाला युसुफजई आणि कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि सर्व मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी लढा देणाऱ्या सत्यार्थी यांच्या कार्याचा हा गौरवच आहे.
-  बालहक्क कार्यकर्ते
-  बालकामगार विरोधी चळवळ – बचपन बचाओ आंदोलन
-  आतापर्यंत 80,000 बालकामगारांची सुटका केली
-  त्यांचं पुनर्वसन आणि शिक्षण केलं
-  ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबरमध्ये सहभाग



 

कैलाश सत्यार्थी
यंदाचा म्हणजेच, 2014 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आलाय. पाकिस्तानाची कार्यकर्ती मलाला युसुफजई आणि कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि सर्व मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी लढा देणाऱ्या सत्यार्थी यांच्या कार्याचा हा गौरवच आहे.
-  बालहक्क कार्यकर्ते
-  बालकामगार विरोधी चळवळ – बचपन बचाओ आंदोलन
-  आतापर्यंत 80,000 बालकामगारांची सुटका केली
-  त्यांचं पुनर्वसन आणि शिक्षण केलं
-  ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबरमध्ये सहभाग  

2/11

अमर्त्य सेन


मूळ भारतीय असलेले अर्थशास्त्र अमर्त्य सेन... 'द आर्ग्युमेन्टेटिव्ह इंडिया' हे त्यांचं पुस्तक बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिलं...  पण, अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी ही वादातीत आहे. याच क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना 1998 मध्ये नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

 

अमर्त्य सेन
मूळ भारतीय असलेले अर्थशास्त्र अमर्त्य सेन... 'द आर्ग्युमेन्टेटिव्ह इंडिया' हे त्यांचं पुस्तक बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिलं...  पण, अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी ही वादातीत आहे. याच क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना 1998 मध्ये नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     

3/11

आर. के. पचौरी


राजेंद्र पचौरी यांनी पर्यावरण क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. राजेंद्र खूप वर्षापासून टेरी (टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट)शी जोडलेले होते. जलवायू परिवर्तनसाठी 2007 मध्ये त्याना संयुक्त राष्ट्रच्या जलवायू परिवर्तनसाठी बनविलेल्या कमिटीसोबत शांतीसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

 

आर. के. पचौरी
राजेंद्र पचौरी यांनी पर्यावरण क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. राजेंद्र खूप वर्षापासून टेरी (टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट)शी जोडलेले होते. जलवायू परिवर्तनसाठी 2007 मध्ये त्याना संयुक्त राष्ट्रच्या जलवायू परिवर्तनसाठी बनविलेल्या कमिटीसोबत शांतीसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.   

4/11

सुब्रहमण्यम चंद्रशेखर


चंद्रशेखर याचा जन्म 1910 मध्ये लाहोरमध्ये झाला. त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असून त्यांनी अॅस्ट्रोफिझिक्स या विषयात आकृती आणि तारे कसे सैद्धांतिक होऊ शकतात, याचा शोध घेतला. याच शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

 

सुब्रहमण्यम चंद्रशेखर
चंद्रशेखर याचा जन्म 1910 मध्ये लाहोरमध्ये झाला. त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असून त्यांनी अॅस्ट्रोफिझिक्स या विषयात आकृती आणि तारे कसे सैद्धांतिक होऊ शकतात, याचा शोध घेतला. याच शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.    

5/11

मदर तेरेसा


मदर तेरेसा या मूळच्या अल्बानियाच्या... पण, त्यांनी आपल्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ भारतातच व्यतीत केला. त्यांनी कोलकातामध्ये गरीब आणि पीडितांसाठी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे. १९७९ साली त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला त्यांचा मृत्यू होईपर्यंत कोलकातामध्ये राहिल्या असून त्याची संस्था गरीबांसाठी काम करते.

 

मदर तेरेसा
मदर तेरेसा या मूळच्या अल्बानियाच्या... पण, त्यांनी आपल्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ भारतातच व्यतीत केला. त्यांनी कोलकातामध्ये गरीब आणि पीडितांसाठी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे. १९७९ साली त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला त्यांचा मृत्यू होईपर्यंत कोलकातामध्ये राहिल्या असून त्याची संस्था गरीबांसाठी काम करते.  

6/11

वेंकट रामाकृष्णन


वेंकट रामाकृष्णन यांचा जन्म मदुराईचा... आता ते केम्ब्रिज विद्यापिठात वाचन-शिक्षण घेत आहेत. 2009 मध्ये रायबोसोममधील स्ट्रक्चर आणि कार्यप्रणालीच्या क्षेत्रात शोध लावल्यामुळे त्यांना केमिस्ट्रीसाठी नोबेल पुरस्कार दिला गेलाय.

 

 

वेंकट रामाकृष्णन
वेंकट रामाकृष्णन यांचा जन्म मदुराईचा... आता ते केम्ब्रिज विद्यापिठात वाचन-शिक्षण घेत आहेत. 2009 मध्ये रायबोसोममधील स्ट्रक्चर आणि कार्यप्रणालीच्या क्षेत्रात शोध लावल्यामुळे त्यांना केमिस्ट्रीसाठी नोबेल पुरस्कार दिला गेलाय.    

7/11

व्हीएएस नायपॉल


त्रिनिदाद अॅन्ड टोबेगोमध्ये जन्मलेले विद्याधर सूरजप्रसाद... नायपॉल यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण नेहमीच वादात राहिलाय. 2001 साली साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी नायपॉल यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. नायपॉल ब्रिटनमध्ये स्थायिक झालेत. 

 

 

व्हीएएस नायपॉल
त्रिनिदाद अॅन्ड टोबेगोमध्ये जन्मलेले विद्याधर सूरजप्रसाद... नायपॉल यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण नेहमीच वादात राहिलाय. 2001 साली साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी नायपॉल यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. नायपॉल ब्रिटनमध्ये स्थायिक झालेत.     

8/11

सावी रमण


सावी रमण यांचा जन्म 1888 मध्ये मद्रास इथे झाला. त्यांनी ‘फिजिक्स’ म्हणजेच भौतिकशास्त्रात आपलं योगदान नोंदवलं. सूर्य प्रकाशाच्या प्रभावावर त्यांचा अभ्यास 'रमन इफेक्ट' नावानं गाजला. 1930 मध्ये सावी रमण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

सावी रमण
सावी रमण यांचा जन्म 1888 मध्ये मद्रास इथे झाला. त्यांनी ‘फिजिक्स’ म्हणजेच भौतिकशास्त्रात आपलं योगदान नोंदवलं. सूर्य प्रकाशाच्या प्रभावावर त्यांचा अभ्यास 'रमन इफेक्ट' नावानं गाजला. 1930 मध्ये सावी रमण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

9/11

हरगोविंद खुराना


भारतीय शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. खुराना यांनी अॅन्टी बायोटिक खाल्यानं शरीरावर कसे परिणाम होऊ शकतात, यावर संशोधन केलं होतं. खुराना यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असून त्यांनी अमेरिकेमधील ‘एमआयटी इन्स्टिट्यूट’मधून शिक्षण घेतलंय. ते अमेरिकेतच स्थायिक झाले होते.  

 

हरगोविंद खुराना
भारतीय शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. खुराना यांनी अॅन्टी बायोटिक खाल्यानं शरीरावर कसे परिणाम होऊ शकतात, यावर संशोधन केलं होतं. खुराना यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असून त्यांनी अमेरिकेमधील ‘एमआयटी इन्स्टिट्यूट’मधून शिक्षण घेतलंय. ते अमेरिकेतच स्थायिक झाले होते.    

10/11

रविंद्रनाथ टागोर

हे भारतातील प्रथम नोबेल पुरस्कार विजेते होते... इतकंच नाही, तर युरोपीयन नागरिक नसूनही नोबेल पुरस्कार मिळवणारे रविंद्रनाथ पहिलेच... साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी टागोर यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. 1913 साली रविंद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

 

 

रविंद्रनाथ टागोर हे भारतातील प्रथम नोबेल पुरस्कार विजेते होते... इतकंच नाही, तर युरोपीयन नागरिक नसूनही नोबेल पुरस्कार मिळवणारे रविंद्रनाथ पहिलेच... साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी टागोर यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. 1913 साली रविंद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.     

11/11

यंदाचा शांततेचा पुरस्कार ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रणेते कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना विभागून देण्यात आलाय. कैलाश सत्यार्थी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे दुसरे भारतीय ठरलेत. याआधी हा पुरस्कार मदर तेरेसा यांना प्रदान करण्यात आला होता.
आजपर्यंत, भारताशी संबंधित असलेल्या नऊ महानुभवांनी इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतही नोबेल पुरस्कार पटकावलाय... एक नजर टाकुयात याच नोबेल पुरस्कार विजेत्यांवर... 
   

 

यंदाचा शांततेचा पुरस्कार ‘बचपन बचाओ आंदोलना’चे प्रणेते कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना विभागून देण्यात आलाय. कैलाश सत्यार्थी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे दुसरे भारतीय ठरलेत. याआधी हा पुरस्कार मदर तेरेसा यांना प्रदान करण्यात आला होता.
आजपर्यंत, भारताशी संबंधित असलेल्या नऊ महानुभवांनी इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतही नोबेल पुरस्कार पटकावलाय... एक नजर टाकुयात याच नोबेल पुरस्कार विजेत्यांवर...