मृत्यूनंतरही नातेवाईकांसोबतच 'जगतात' इथले गावकरी, या गावात निधन म्हणजे उत्सव!

जर तुम्हाला एका मृतदेहाबरोबर राहायला सांगितले तर ? आपल्याला  ऐकायला फार भयानक वाटतं असलं तरी, इंडोनेशियातील या समाजासाठी असे राहणे त्यांच्या परंपरेचा भाग आहे.

Sep 07, 2024, 18:02 PM IST

हा समाज असे मानतो की ,मृत्यू ही एक दिर्घकाळापर्यत चालणारी प्रक्रिया आहे.जीवन-मृत्यू हे परस्परसंबंधी असतात.मृत्यूनंतर पूरलेले मृतदेह उकरुन काढून घरी नेतो हा समाज.

1/7

इंडोनेशियातील एक समाज असा आहे ,जो जन्म- मृत्यूचे चक्र मानतचं नाही .  एखादा नातेवाईक वारला की, या गावात शोकांकिका नाही तर मोहत्सव साजरे होतात. मृत्यूनंतरही आपले नातेवाईक आपल्यातचं असतात ,अशी न पचणारी संकल्पना या समाजात पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

2/7

मृतासाठी अन्न् , द्रव्ये आणि सिगारेट

माणूस वारला की त्याचे अंत्यविधी करायला हा समाज कधी काही दिवस घेतो किंवा कधी अनेक वर्षे .या मधल्याकाळात मृत व्यक्ती घरात, घरच्या लोकांबरोबर राहतो. नातेवाईक मृतास आजारी व्यक्ती मानून त्याची सेवा करतात. दिवसातून दोनदा मृतदेहाला अन्न् , द्रव्ये आणि सिगारेट देतात.

3/7

मृतदेह स्वच्छ करण्याचा सोहळा

ही प्रथा इंडोनेशियातील 'साऊथ सुलावेसी' या ठिकाणच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या 'तोराजा' समाजाची आहे. या अजब प्रथेचे नाव 'मानेने'(Ma'nene) असे आहे. 'मानेने' म्हणजे मृतदेह स्वच्छ करण्याचा सोहळा.या विधीदरम्यान तोराजा लोकं त्यांच्या वारलेल्या नातेवाईकांचे मृतदेह चक्क उकरुन काढतात. पूरुन कितीही दिवस झाले असोत ,अनेक वर्षे गेली तरी ते मृतदेह बाहेर काढतात आणि त्यांना बाहेर काढल्यावर जीविताप्रमाणे वागणूक देतात.

4/7

समाजाची मान्यता

तोराजा समाज, माणूस एकदा गेला की गेला या विचाराला मूळीच दूजोरा देत नाही. त्यांची मान्यता अशी आहे की, मानवाचे निर्गमन होत नाही, मृत्यू ही एक दिर्घकाळापर्यत चालणारी प्रक्रिया आहे. तोराजा लोग मृतदेहाला 'तो-माकूला' असे म्हणतात. त्यांना जीविताप्रमाणे अधिकार असतात ,असे हा समाज मानतो. जीवन-मृत्यू हे परस्परसंबंधी असतात, अशी या समाजाची मान्यता आहे. 

5/7

मृताची सेवा करण्याचे कारण

मृतास नियमितपणे अंघोळ घातली जाते , त्याचे कपडे बदलले जातात. एवढच नाही तर, मृताच्याखोलीत त्याला शौचास जाण्यासाठी एक भांडे ठेवले जाते. समाजातले लोक मृताला एकटे कधीच सोडत नाहीत आणि रात्री झोपताना मृतासाठी एक दिवा कायम चालू ठेवतात. हे लोक असं मानतात की, जर त्यांनी मृताची निट सेवा केली नाही ,तर त्याची आत्मा कोपेल आणि विघ्न निर्माण करेल.  

6/7

मृतदेहांचे विघटन थांबवायला वापरातात रसायन

पूर्वीच्याकाळी मृतदेहांचे विघटन थांबवण्यासाठी , लोक विविध औषधी वनस्पतींचा आणि पानांचा वापर करायचे . मात्र आता ते 'फॉर्मलिन' या रसायनाचा वापर करतात. या रासायनिक पदार्थांचा वास खूप उग्र असतो आणि तो घरभर येत राहतो.

7/7

गावकऱ्यांच्यादृष्टीने उत्सव

गावाबाहेरील लोकांना हा विधी कितीही अर्थहीन वाटला आणि आपण या विधीला अंत्यविधी म्हटले , तरी गावकऱ्यांसाठी हा एक उत्सव आहे आणि त्यांच्यादृष्टीने त्यांची मान्यता फार अर्थपूर्ण आहे.