सेमी फायनलपूर्वी गेल बोलला कोहलीबद्दल...

 यंदाच्या वर्ल्ड टी २० स्पर्धेचा भारत प्रबळ दावेदार असून त्याच्याकडे अनेक मॅच विनर असल्याचे वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर क्रिस गेल याने मान्य केले आहे. पण कॅरेबियन संघात टीम उलटफेर करण्याची ताकद आहे, तशी योजना आम्ही करत असल्याचे गेलने सांगितले. 

Updated: Mar 29, 2016, 08:46 PM IST
 सेमी फायनलपूर्वी गेल बोलला कोहलीबद्दल... title=

मुंबई :  यंदाच्या वर्ल्ड टी २० स्पर्धेचा भारत प्रबळ दावेदार असून त्याच्याकडे अनेक मॅच विनर असल्याचे वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर क्रिस गेल याने मान्य केले आहे. पण कॅरेबियन संघात टीम उलटफेर करण्याची ताकद आहे, तशी योजना आम्ही करत असल्याचे गेलने सांगितले. 

वेस्ट इंडिज टीमने आज ब्रेबॉन स्टेडिअमवर  सराव केल्यानंतर पत्रकाराशी  गेल म्हणाला. त्यांचा संघ केवळ विराट कोहलीवर लक्ष केंद्रीत करत नसू सर्व संघावर आमचे लक्ष आहे. विराटने स्पर्धेत खूप चांगला खेळ केला आहे. भारताने एक सामना गमावल्यावर पुनरागमन केले आहे. त्यामुळे टीम लयमध्ये आली आहे. सेमी फायनल मॅचपूर्वी सर्व जण आत्मविश्वासाने परीपूर्ण आहेत. 

विराट रन्स काढू शकणार नाही...

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या सेमी फायनलबाबत आता वातावरण निर्मिती होऊ लागलीय. विंडिजचा तडाखेबंद बॅट्समन ख्रिस गेलनं सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली रन्स काढू शकणार नाही अशी वल्गना केलीय. जर त्यानं रन्स काढल्या तरी हरकत नाही मात्र टीम इंडिया पराभूत झाली पाहिजे असंही त्यानं म्हटलय.

एकालाच टार्गेट करणे मुश्किल 

टीम इंडियात एकाच खेळाडूला टार्गेट करणे मुश्लिक आहे. त्यांच्या संघात अनेक ऑलराउंडर आहेत. त्याचा चांगला क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. त्यामुळे ते प्रबळ दावेदार आहे. भारतात टीम इंडियाला हरविणे खूप अवघड जाणार आहे. पण वेस्ट इंडिज झटका देण्याची क्षमता ठेवते.