कांगारुंना लोळवून भारतानं रचला इतिहास

टी-20 सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं दारुण पराभव केला.  140 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच जमिनीवर व्हाईट वॉश करण्याचा विक्रम भारतानं केला आहे.

Updated: Jan 31, 2016, 06:51 PM IST
कांगारुंना लोळवून भारतानं रचला इतिहास title=

सिडनी: टी-20 सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं दारुण पराभव केला.  140 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच जमिनीवर व्हाईट वॉश करण्याचा विक्रम भारतानं केला आहे.

3-0 नं मिळालेल्या या विजयामुळे भारत आयसीसीच्या टी-20 च्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसीनं जाहिर केलेल्या या क्रमवारीत भारताकडे 120 पॉईंट्स आहेत, तर वेस्ट इंडिज दुसऱ्या आणि श्रीलकां तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

याआधीच भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर एक वर पोहोचला होता. तर वनडेच्या क्रमवारीतही धोनी ब्रिगेड सध्या 2 नंबरवर आहे.