भारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट

भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे.

Updated: Mar 6, 2016, 06:06 PM IST
भारत-बांग्लादेश आशिया कप फायनलवर संकट title=

मीरपूर: भारत आणि बांग्लादेशमधल्या आशिया कपच्या फायनलला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. 

मीरपूरमध्ये सध्या पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे स्टेडियमवर कव्हर टाकण्यात आली आहेत. मॅचपूर्वी स्टेडियमवर प्रॅक्टिस करण्यासाठी आलेले खेळाडूही पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.