महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतरही विजय चौधरीची खंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याची खंत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Updated: Dec 11, 2016, 10:10 PM IST
महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतरही विजय चौधरीची खंत title=

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याची खंत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या अभिजित कटके वर मात करून कुस्तीत तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी 'किताब पटकावून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगावचा विजय चौधरी याने महाराष्ट्राची शान वाढवली आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजयच्या यशाने त्याच्या कुस्तीगीर कुटुंबीयांमध्ये प्रचंड आनंद आहे मात्र हा आनंद साजरा करत असतानाच त्याच्या कुटुंबीयांमध्ये सरकारविरोधी नाराजीचं वातावरण आहे.

सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरीला मुख्यमंत्र्यांनी नोकरीचं आश्वासन दिलं होतं. नरसिंग यादवचा विक्रम मोडत आता विजयने महाराष्ट्र केसरी जिंकण्याची हॅट्रिक साधली आहे. आता तरी सरकारनं नोकरीचं आश्वासन पूर्ण करावं अशी अपेक्षी चौधरीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.