'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

१ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे.

Updated: May 24, 2017, 05:53 PM IST
'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच' title=

मुंबई : १ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे. याआधी भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे. या सामन्यावर विराटनं भाष्य केलं आहे. क्रिकेट रसिकांसाठी भारत-पाकिस्तान मॅच रोमांचक असते पण आमच्यासाठी इतर मॅचएवढच या मॅचला महत्त्व आहे, असं विराट म्हणाला आहे. या स्पर्धेमध्ये फक्त आघाडीच्या टीम असल्यानं चुरस वाढल्याचंही कोहली म्हणाला आहे.