<B> <font color=red> निरोप : </font></b> सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 17, 2013, 12:26 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.
मित्रांनों...मला बोलू द्या...मी अजूनच भावूक होईन...मी गेल्या २४ वर्षांपासून फक्त २२ यार्डमध्येच जगलो...आणि आता विश्वासच बसत नाहीए की हा प्रवास संपलाय...आज यावेळी मला अनेकांचे आभार मानायचेत...माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदाच मी हा कागद जवळ ठेवलाय. या कागदावर त्या सर्वांची नावं आहेत ज्यांचे मला आभार मानायचेत...मला खात्री आहे की तुम्ही आजही मला सांभाळून घ्याल...कारण आता बोलणं जरा अवघड होतं चाललंय....
माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती, ज्यांची मला आज खूप आठवण येतेय..ते माझे बाबा....१९९९ला ते मला सोडून गेले...त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मला नाही वाटत की आज मी इथे तुमच्या समोर उभा असतो...वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, आणि म्हणाले...'तु तुझं स्वप्न पूर्ण कर पण त्यासाठी शॉटकर्ट घेऊ शकोस...मार्ग खडतर असला तरी हार मानू नको'...मी फक्त त्यांच्या या निर्देशाचं पालन केलं..सर्वात महत्वाचं म्हणजे 'एक चांगला माणूस हो' आणि मी मनापासून त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि यापुढेही करत राहिन...मी जे जे काही केलं, माझे बाबा माझ्या पाठिशी उभे राहिले.. आज मला त्यांची खूप आठवण येतेय...
माझी आई..मला नाही माहित माझ्या सारख्या खट्याळ मुलाला तिनं कसं सांभाळलं?...मी इतका सोपा नव्हतो...तिच्या धैर्याला माझा सलाम...कोणत्याही आईसाठी आपल्या मुलांचं स्वास्थ आणि त्यांची सुरक्षा यापेक्षा काहीच महत्वाचं नव्हतं..आणि माझी आईही तशीच...तीनं माझी खूप काळजी घेतली...गेल्या २४ वर्षांपासून मी देशासाठी क्रिकेट खेळतोय पण माझी आई त्याही आधीपासून ज्या दिवशी मी बॅट हातात घेतली त्या दिवसापासून माझ्यासाठी प्रार्थना करतेय...तिच्या प्रार्थना आणि तिचे आशीर्वाद यामुळेच मला शक्ति मिळाली आणि त्यामुळेच परफॉर्म करु शकलो... आईला माझा प्रणाम...
माझ्या शालेय जीवनात तब्बल ४वर्ष मला माझ्या काका-काकूंकडे रहावं लागलं. कारण घरापासून माझी शाळा लांब होती. त्यांनी मी त्यांच्या मुलासारखाच... खेळून, सराव करुन दमलेला मी जेव्हा घरी यायचो तेव्हा अर्धवट झोपेत असयचा अशा वेळीही काकू मला जेवण भरवायच्या...मी दुस-या दिवशी खेळावं यासाठी त्या मला भरवायच्या...ते क्षण मी कधीही विसरु शकत नाही..मी त्यांच्याही पुत्र आहे...
माझा मोठा भाऊ नितीन आणि त्याचे कुटुंबिय यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं..दादाला जास्त बोलण्याची सवय नाही पण त्याने मला इतकचं सांगितलं की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तु जे काही करशील ते मनापासून आणि आपलं सर्वस्व झोकून करशील...त्याचे हे शब्द कायमच माझी प्रेरणा ठरलेत.. माझी बहिण सविता तीही अशीच.. माझ्या आयुष्यातली पहिली बॅट तिनचं मला भेट म्हणून दिली होती... आणि तिथूनच माझा प्रवास सुरु झाला.. मी खेळत असताना आजही ती माझ्यासाठी उपवास करते...थँक यू...
अजित.... माझा भाऊ... त्याच्या बद्दल मी काय बोलू? आपण दोघांनी मिळून हे स्वप्न जगलंय... माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी त्यानं त्याचं करिअरचा त्याग केला.. माझ्यातला क्रिकेट स्पार्क त्यानं ओळखला आणि हे सर्व वयाच्या अकराव्या वर्षीच... तोच जो मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं... तुम्हाला खरं वाटणार नाही पण काल रात्री त्यानं मला फोन केला आणि तेव्हाही मी बाद कसा झालो त्याबद्दलच आम्ही चर्चा करत होतो... त्याचं आणि माझं हे नातं आमच्या जन्मापासून असंच आहे... आणि ते तसंच राहिलंय.. मी क्रिकेट खेळत नसेन तेव्हाही आम्ही क्रिकेट बद्दलच चर्चा करत असतो... अनेक गोष्टींवर आमच्यात मतभेदही झालेत. त्याच्या अनेक मतांशी मी सहमत नव्हतो आणि तोही माझ्या मतांशी सहमत नसायचा... पण आज मागे वळून पहाताना मला हेच दिसतं की आमच्यात जर हे वाद-संवाद झाले नसते तर आज मी क्रिकेटर म्हणून नक्कीच कमी पडलो असतो...
माझ्या जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट.. जी १९९१ला घडली, जेव्हा मी अंजलीला भेटलो... ती वेळ खूप सुंदर होती.. ती वेळ आजही तशीच