सर्जिकल स्ट्राईकवरुन उद्धव ठाकरेंची भाजपसह काँग्रेसवर टीका

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरून लज्जास्पद राजकारण चालू आहे, अशी टीका भाजपसह काँग्रेसवर शिवसेना कार्यध्येक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

Updated: Oct 14, 2016, 08:09 AM IST
सर्जिकल स्ट्राईकवरुन उद्धव ठाकरेंची भाजपसह काँग्रेसवर टीका title=

मुंबई : काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरून लज्जास्पद राजकारण चालू आहे, अशी टीका भाजपसह काँग्रेसवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

सर्जिकल स्ट्राईक झालं त्याचा देशाला अभिमान आहे. देशाच्या जनतेसाठी सैनिक जिवाची बाजी लावतात. मात्र श्रेय लाटण्यासाठी राजकारण सुरु आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही केलं आम्ही केलं असं सध्या चालू आहे. तसंच पंतप्रधान आणि सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्याची ही वेळ आहे राजकारण करण्याची नव्हे तर एकजूट राहण्याची वेळ आहे, असं ही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.