काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते : गडकरींचा टोला

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे., गडकरी म्हणाले, 'सत्ता असताना कधीही जातीचं भले न केलं नाही, आणि काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते.'

Updated: Oct 6, 2016, 11:15 PM IST
काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते : गडकरींचा टोला title=

मुंबई : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे., गडकरी म्हणाले, 'सत्ता असताना कधीही जातीचं भले न केलं नाही, आणि काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते.'

राज्य कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे, आरक्षणावर बोलताना गडकरी म्हणाले, 'भाजपसाठी गरीब माणूस केंद्रबिंदू आहे आणि असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे. ज्यात कुणालाही आरक्षण मागायची वेळ येणार नाही'.

गडकरी शेवटी म्हणाले, 'सरकारची चांगली काम कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावं. विकास हेच विरोधकांना उत्तर आहे'.