कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

Updated: Dec 11, 2014, 10:52 PM IST
कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

सध्या नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनातही कुलगुरू निवडीचा हा वाद गाजण्याची शक्यता आहे. कुलगुरूंविरोधात न्यायालयाने ओढलेले ताशेरे अशोभनीय आहेत, असं सांगतानाच याप्रकरणी एडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.

राजन वेळूकर हे कुलगुरूपदासाठी अयोग्य असल्याचा असा निष्कर्ष मुंबई हायकोर्टानं काढलाय. मात्र अंतिम निर्णय़ासाठी वेळूकरांचं प्रकरण मुख्य़ न्यायाधिशांच्या नेतृत्वातल्या मूळपीठाकडे पाठवण्यात आलंय़. त्यामुळं त्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. वेळूकर यांनी नियुक्ती प्रक्रियेत फेरफार केल्याचाही ठपका हायकोर्टानं ठेवलाय. 

वेळूकर यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेले रिसर्च कागदपत्रं निवड समितीनं दुर्लक्षित केल्याचं नमूद करत निवड समितीलाही  हायकोर्टानं धारेवर धरलंय. डॉ. ए डी सावंत आणि गुणवंत पाटील यांनी वेळूकर यांच्या नियुक्तीविरोधात याचिका केलीय. वेळूकर यांच्या पीएचडीमध्ये घोळ असल्याचा आरोप डॉ. ए. डी. सावंत यांनी याचिकेत केलाय. 

वेळूकर यांच्या कुलगुरूपदाची मुदत जूलै २०१५ मध्ये संपत आहे. मात्र त्याआधीच त्यांना कुलगुरूपदावरून पायउतार व्हावं लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

दरम्यान, सर्वच कुलगुरूंच्या कारभाराचं फेरमूल्यांकन व्हावं, अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलीय.  त्यांनी काय ट्विट केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.