उद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. 

Updated: Nov 8, 2015, 03:15 PM IST
उद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन title=

मुंबई :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. 
नितीश कुमार यांना केलेल्या फोनमध्ये उद्धव यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या पराभवाला जशा सोनिया गांधी जबाबदार होत्या. तशाच बिहारमधील पराभवाला मोदी जबाबदार आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असेही ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्र निवडणुका झाल्या तर भाजपची स्थिती खराब - राऊत 

बिहार निकालावरून शिवसेनेनं भाजपावर शरसंधान केलंय... महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर भाजपाची बिहारसारखी अवस्था होईल अशी टीका शिवसेनेनं भाजपावर केलीय. तसंच संजय राऊतांनी नितीशकुमारांचं अभिनंदन केलंय तर पराभवाला मोदी जबाबदार असल्याचं म्हटलंय..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.