राज ठाकरे न बोलता निघून गेलेत

शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या सध्याच्या वादाचं कारण ठरलेल्या भांडूपच्या थीम पार्कचं राज ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र भूमीपूजनानंतर कोणत्याही विषयावर न बोलता राज ठाकरे निघून गेले.

Updated: Aug 23, 2014, 08:21 PM IST
राज ठाकरे न बोलता निघून गेलेत title=

मुंबई : शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या सध्याच्या वादाचं कारण ठरलेल्या भांडूपच्या थीम पार्कचं राज ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र भूमीपूजनानंतर कोणत्याही विषयावर न बोलता राज ठाकरे निघून गेले.

मनसे आमदार मंगशे सांगळे यांच्या प्रयत्नातून हे थीम पार्क उभे राहात आहे. मात्र मनसेने भांडुपेश्वर कुंडाच्या सुशोभीकरणासाठी परवानगी घेतली आहे, थीम पार्कची जागा मिठागराची आहे असा आरोप शिवसेनेने केलाय. 

मतांच्या राजकारणासाठी हा अनधिकृत थीमपार्क उभा राहात असल्याची टीका शिवसेनेने केलीय. मात्र थीमपार्कसाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत अशी माहिती मंगेश सांगळे यांनी दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.