रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2012, 02:13 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.
रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत हकीम समितीची शिफारस शासनाकडून मान्य करण्यात आली. भाडेवाढीच्या सूत्रानुसार सरकारने रिक्षाला पहिल्या टप्प्यासाठी १२ रुपयांच्या मूळ भाड्यात तीन रुपयांची वाढ करून १५ रुपये एवढे केले आहे, तर टॅक्सीच्या मूळ (१७) भाड्यात २ रुपयाची वाढ करून १९ रुपये एवढे केले आहे.
हकीम समितीने टॅक्सीची १ रूपयांने भाडेवाढीची शिफारस केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यानी दोन रूपये वाढ देऊन टॅक्सी संघटनेवर मेहरबानी दाखविली आहे. सीएनजी टॅक्सीची भाडेवाढीची मागणी नसतानाही सरसकट टॅक्सीची भाडेवाढ केली आहे. सरकारने प्रवाशांना भाडेवाढीचे गिप्ट देत आणखीच महागाईत लोटले आहे.
दरम्यान, रात्री १२ ते ५ या वेळेतील प्रवासाच्या भाड्यात मूळ भाड्याच्या ३० टक्के वाढ देण्याची शिफारस हकीम समितीने केली होती. सरकारने ती फेटाळत पूर्वीप्रमाणेच मूळ भाड्याच्या २५ टक्केच भाडे रात्र प्रवासासाठी आकारावे असे स्पष्ट केले. तर पंधरा-वीस वर्षे वयाच्या जुन्या पद्मिनी टॅक्सी सध्या मेकॅनिकल मीटरवर चालत आहेत. त्यामध्ये तत्काळ बदल करून ई-मीटर बसवावेत, असे याआधी सरकारने स्पष्ट केले आहे.