देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा दिलासा

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळालाय.

Updated: Dec 23, 2014, 04:05 PM IST
देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा दिलासा title=

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळालाय.

आवाजी मतदाने फडणवीस सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केले होते. त्या विरोधात केतन तिरोडकर यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा न्यायालयाला अधिकार नसल्याचे सांगत न्यायलायाने ही याचिका फेटाळून लावली. आवाजी मतदाना करता वापरण्यात आलेली पद्धत घटनाबाह्य असून, फडणवीस सरकारने मंत्रीपदांची शपथ दिली. पण सरकार स्थापन करण्या करता कोणी कोणाच्या बाजूने मतदान केलं.

याबाबत बहुमत सिद्ध करणारे पत्र राज्यपालांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे ही आवाजी पद्धत म्हणजे एक प्रकारे फसवणुक असून तशी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.