नाथाभाऊ यापुढे सांभाळून बोलतील ही अपेक्षा : भुजबळ

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना लेकीला फोन करावा लागतो, म्हणून मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, पण वीजेचे बिल भरायला पैसे नाहीत, असं वादग्रस्त विधान केलं होतं, या विधानावर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.

Updated: Nov 26, 2014, 11:52 AM IST
नाथाभाऊ यापुढे सांभाळून बोलतील ही अपेक्षा : भुजबळ title=

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना लेकीला फोन करावा लागतो, म्हणून मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, पण वीजेचे बिल भरायला पैसे नाहीत, असं वादग्रस्त विधान केलं होतं, या विधानावर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.

एकनाथ खडसे आता सत्तेत असल्याने ते सांभाळून बोलतील अशी अपेक्षा आहे, असा टोमणा त्यांनी खडसेंना लगावला आहे, तर शिवसेनेची शेतकऱ्यांविषयीची भूमिका योग्य असून, विरोधीपक्षाची भूमिकाही ते व्यवस्थित पार पाडत आहेत, आणि विरोधी पक्षात असल्यामुळे ही भूमिका योग्य आहे, असं म्हणावं लागेल असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.