मुंबईत धावत्या रिक्षाला आग, आठ जण जखमी

मुंबईत धावत्या रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातील आठ जण जखमी झालेत. त्यामध्ये तीन मुलं आणि पाच महिलांचा समावेश आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात रात्री ही दुर्घटना घडलीये. 

Updated: Sep 26, 2016, 09:02 AM IST
मुंबईत धावत्या रिक्षाला आग, आठ जण जखमी title=

मुंबई : मुंबईत धावत्या रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातील आठ जण जखमी झालेत. त्यामध्ये तीन मुलं आणि पाच महिलांचा समावेश आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात रात्री ही दुर्घटना घडलीये. 

शिवाजीनगरहून लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेनं ही रिक्षा जात होती. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षातील सीएनजीचं लीकेज होत होतं आणि स्पार्क होऊन रिक्षाला आग लागली. 

जखमी झालेल्यांना सायनच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. भाजल्यांमध्ये दोन ते पाच महिन्यांची बालकं आहेत. कर्नाटकमध्ये एका कौटुंबिक सोहळ्याला हजर राहण्यासाठी एकाच कुटुंबातील आठ जण कुर्ला टर्मिनसकडे जात होते.