रेल्वेच्या धडकेत चौघांचा मृत्यू

मुंबईमधल्या रेल्वे अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये

Updated: Feb 19, 2016, 09:31 AM IST
रेल्वेच्या धडकेत चौघांचा मृत्यू title=

मुंबई: मुंबईमधल्या रेल्वे अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. रेल्वेनं दिलेल्या धडकेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चौघंही रेल्वेचे कर्मचारी होते. 

घाटकोपर ते कुर्लादरम्यान हे कर्मचारी रेल्वेच्या ट्रॅकचं काम करत होते, तेव्हा ट्रेननं त्यांना धडक दिली. या चौघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं होतं. पण तिकडे त्यांचा मृत्यू झाला.