असहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे

सहिष्णुता आणि असहिष्णुता यांच्यात बरेच जणांचा गोंधळ उडालाय, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. 

Updated: Apr 15, 2016, 10:27 AM IST
असहिष्णुतेवर बरेच जण गोंधळात - सुशीलकुमार शिंदे title=

पुणे : सहिष्णुता आणि असहिष्णुता यांच्यात बरेच जणांचा गोंधळ उडालाय, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. 

सहिष्णुता आणि असहिष्णुतेच्या व्याख्येवरुन अनेक जण गोंधळले असून अशांनी 
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेचा आधार घ्यावा, असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. पुण्यातल्या सिम्बॉयसिस संस्थेतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी इथल्या आंबेडकर स्मारकाला त्यांनी भेट दिली. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचं उदघाटन शिंदे यांनी केलं. तसंच बाबसाहेब आंबेडकर जीवनदर्शन पुस्तकाचं प्रकाशन देखील यावेळी करण्यात आलं.