रामटेक हवा, भावना जोडल्या गेल्यात - पंकजा मुंडे

 माझी रामटेकचीच मागणी  कायम आहे. माझ्या भावना त्या  बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी या बंगल्याची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे - मुंडे यांनीच दिली.

Updated: Nov 13, 2014, 11:52 PM IST
रामटेक हवा, भावना जोडल्या गेल्यात - पंकजा मुंडे title=

बीड : माझी रामटेकचीच मागणी कायम आहे. माझ्या भावना त्या बंगल्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी या बंगल्याची मागणी केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे - मुंडे यांनीच दिली.

भाजपच्या सरकारचा काल विश्वास दर्शक प्रस्ताव पारित झाला. आम्हाला खाते, मंत्रालयातील दालने मिळाली. मात्र निवासस्थान मिळालेले नाही. मी रामटेक या बंगल्याची मागणी केली आहे तोच मला मिळावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केलेय.,पंकजा यांच्या या मागणीमुळे भाजप सरकारमधील मंत्र्यांमध्ये बंगल्यावरून स्पर्धा सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पंकजा या बीड येथे आल्या होत्या. आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळ ,प्रशासन यावर भाष्य केले . रामटेक या बंगल्याशी आपले भावनिक नाते आहे त्यामुळे आपण या बंगल्याची मागणी केली आहे शेवटी मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही पंकजा यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.