कोरडी होळी खेळा, अन्यथा...

राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करत आहेत. 

Updated: Mar 20, 2016, 04:19 PM IST
कोरडी होळी खेळा, अन्यथा... title=

ठाणे: राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही असंच आवाहन केलं आहे. पण हे आवाहनही मनसेच्या शैलीमध्ये केलं आहे. 

पाण्याचा वापर करत असतील तर आधी हात जोडा, तरीही ऐकले नाहीत तर हात सोडा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

 ठाण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला, या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे होळीच्या काळात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.