नाशिककरांनो पाणी जपून वापरा!

संपूर्ण महाराष्ट्रात जवळ-जवळ पावसाने हजेरी दिली असतांना खानदेशात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे.

Updated: Jul 13, 2014, 07:00 PM IST
नाशिककरांनो पाणी जपून वापरा! title=

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात जवळ-जवळ पावसाने हजेरी दिली असतांना खानदेशात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातही आता मर्यादीत जलसाठा असल्याने, नाशिककरांनी जपून पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

खानदेशात पावसाची अवकृपा अजुनही कायम असल्याने ही वेळ आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईसह कोकणात संततधार सुरु असताना खानदेशात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. धरणांमधील साठा खालावत चालला आहे.

समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे  अनेक भागात पेरण्याही खोळंबल्या आहेत. खानदेशात अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा धास्तावला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.