कारने घेतला पेट, दोघांचा झाला कोळसा

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला. रसायनी गावच्या हद्दीत एका कारने पेट घेतला. या अपघातात दोघांचा आगीमुळे मृत्यू झाला.

Updated: May 5, 2015, 08:58 AM IST
कारने घेतला पेट, दोघांचा झाला कोळसा title=

मुंबई : पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला. रसायनी गावच्या हद्दीत एका कारने पेट घेतला. या अपघातात दोघांचा आगीमुळे मृत्यू झाला.

मुंबईकडून पुण्याकडे जाणारी  आल्टो कार रस्त्याच्या कोरड्या नाल्यात कोसळली. त्यानंतर कारने पेट घेतला. यावेळी कारमध्ये ५ जण होते.  या अपघातात दोघांचा जळून मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. मृत्यांत एक महिला आणि एक मुलगीचा समावेश आहे. अद्याप मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.