हातभट्टी दारूचे रसायन नष्ट करणाऱ्या तरुणांवरच गुन्हा

चोपडा तालुक्यातल्या कृष्णापूर येथील तरुणांनी हातभट्टीच्या दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले. मात्र या तरुणांवरच गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाल्याने, संतप्त महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. गावात अनेकांचा दारू प्यायलामुळे मृत्यू ओढवला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

Updated: Sep 14, 2016, 11:36 PM IST
हातभट्टी दारूचे रसायन नष्ट करणाऱ्या तरुणांवरच गुन्हा title=

जळगाव : चोपडा तालुक्यातल्या कृष्णापूर येथील तरुणांनी हातभट्टीच्या दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले. मात्र या तरुणांवरच गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाल्याने, संतप्त महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. गावात अनेकांचा दारू प्यायलामुळे मृत्यू ओढवला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव करण्यात आला होता, या ठरावच्या आणि निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक, डी वाय एस पी, तसच चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे तरुणांनी गावातील हातभट्टीचे रसायन अखेर नष्ट केलेयं.