...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर

घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

Updated: Jul 16, 2016, 01:14 PM IST
...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर title=
प्रातिनिधिक फोटो

पुणे : घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये मागील १५ दिवसांपासून पाण्याचा प्रश्न आहे. त्याचा संताप त्यांनी रास्ता रोको करून व्यक्त केला. 

मॉडर्न कॉलेजसमोर त्यांनी जवळजवळ पाऊण तास ठिय्या दिला होता. विशेष म्हणजे इथल्या रहिवाशांनी गेल्या वर्षी देखील याच कारणासाठी आंदोलन केलं होतं.

मात्र, महापालिका प्रशासनाकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळालं नाही. स्मार्ट शहर होऊ घातलेल्या पुण्यातील पोलीस लाईनची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय कथा सांगावी.