कंटेनरने दुचाकीला उडवले, मुंबई - पुणे महामार्गाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

रायगड जिल्ह्यात मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक नाक्यावर कंटेनरने दुचाकीला उडवले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2017, 01:33 PM IST
कंटेनरने दुचाकीला उडवले, मुंबई - पुणे महामार्गाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली title=

खोपोली : रायगड जिल्ह्यात मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक नाक्यावर कंटेनरने दुचाकीला उडवले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला.

या अपघातात सुदैवाने दुचाकीस्वारांने उड़ी मारल्याने ते वाचलेत. दरम्यान, अपघाताचे वृत्त असमजताच चौक येथे ग्रामस्थांनीचा रास्तारोको केला. या रास्तारोकोमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखली. वारंवार आईआरबी कंपनीला सांगून अवजड वाहनांबाबत दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. त्यांनी वाहतूक रोखून धरली.