नगरपरिषद निवडणुकीसाठी रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांचा प्रचार

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत प्रचार केला. गेल्या 50 - 60 वर्षांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं. मात्र, शहरीकरणासाठी आधीच्या सरकारनं कुठलीच योजना आखली नसल्याचं सांगत, त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Updated: Nov 20, 2016, 04:10 PM IST
नगरपरिषद निवडणुकीसाठी रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांचा प्रचार title=

रत्नागिरी : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत प्रचार केला. गेल्या 50 - 60 वर्षांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं. मात्र, शहरीकरणासाठी आधीच्या सरकारनं कुठलीच योजना आखली नसल्याचं सांगत, त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

शहरांचं आरोग्य गेल्या 50 वर्षात बकाल झाल्याचंही त्यांनी म्हटलं. रत्नागिरी शहराच्या विकासाचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. राज्यातल्या नगरपालिकांमधल्या तब्बल 170 योजना अपूर्ण आहेत. तर नोटबंदीमुळे आतंकवाद्यांचा पैसा कागद झाला आणि एका रात्रीत पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी ओतलं गेल्याचंही ते म्हणाले.