उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Updated: Apr 28, 2017, 08:47 AM IST
उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

जॉय जोएल उमाप असं या चिमुरड्याचं नाव आहे. औरंगाबादमधील शांतीपुरा परिसरातील ख्रिस्तीनगरमध्ये ही घटना घडलीय.

गरम पाण्यात पडून जखमी झाल्यानंतर जॉयवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

ख्रिश्चन धर्मियांचा इस्टर हा सण रविवारी साजरा करण्यात आला. उत्सवाच्या निमित्ताने चिकन बिर्याणीचा मेनू तयार करण्याचं काम सुरु होतं. यासाठी गरम करण्यात आलेल्या पाण्यात पडून जॉय भाजला होता. 

त्यानंतर त्याला तात्काळ औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांना यश आले नाही.