भाजपकडून धार्मिक तेढ, सामाजिक ऐक्याला सुरुंग - पवार

भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Updated: Sep 17, 2014, 06:10 PM IST
भाजपकडून धार्मिक तेढ, सामाजिक ऐक्याला सुरुंग - पवार title=

कोल्हापूर : भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराची पहिली सभा घेत कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सभेला पक्षाध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महायुतीवर सडकून टीका केली. 

सत्तेत आल्यावर १०० दिवसांत सगळे प्रश्न सोडवू, कोल्हापुरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या प्रचारसभेत अजित पवार यांनी आश्वासन दिले. यावेळी  राष्ट्रवादी सत्तेवर आली तर शंभर दिवसात कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. यावेळी अजित पवारांचा सिंघम अवतार पाहायला मिळाला. भुजबळ, आर आर पाटील यांनी तुफान टोलेबाजी केली.  यावेळी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

भाजप हा साधू-संतांचा नव्हे तर संधीसाधूंचा पक्ष असल्याची टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली. तर भाजपचा देशात जातीयवाद पसरवण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळांनी केला.  तर आघाडी झाली नाही तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहाच्या दहा जागा निवडून आणण्याचा निर्धार जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.