शिवरायांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पुण्यातल्या भोसरीत सभा पार पडली... 

Updated: Oct 9, 2014, 07:16 PM IST
शिवरायांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता - उद्धव ठाकरे title=

भोसरी, पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झालीय. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी सरकारचा उल्लेख ‘अफझलखानाची फौज’ असा केला होता. तर अमित शहांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना 'चुहा' असा टोला लगावला होता. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी शिवरायांच्या इतिहासाचा दाखला देत, जोरदार प्रत्युत्तर दिलंय...

उद्धव ठाकरे म्हणतात...

* पूर्वी मोगलांचे वेढे पडायचे... आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोटाळ्यांचे वेढे पडतात... पूर्वी गंजीला आग लागली की आपला नेता गडावर पोहचल्याची खून मिळायची... आता, 'मंत्रालयाला आग लागली... की आपले साहेब घोटाळ्यातून सुखरुप सुटले...' असं कार्यकर्त्यांना कळतं... 
* अजित पवारांच्या बॅगेत पैसे सापडले.... घोटाळ्यांचा पैसा आता बाहेर येतोय...
* अजित पवारांनी सांगावं... तुम्हाला एक ग्लास पाणी देतो, पिणार का पाणी?
* मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिक लढला.. पंतप्रधान होईपर्यंत त्यांना शिवसेना हवी होती, पण आता सत्तेत आल्यानंतर नको...
* संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्रात... सिमेवर आमचे सैनिक मारले जात आहेत... तुम्ही फक्त गप्पा मारा... 
* तिकडे गोळीबार सुरू असताना तुम्ही प्रचार करत फिरत आहात.. 
* तुमच्याकडे आम्ही देश दिलाय... देश सांभाळा... महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ आहोत...
* शिवरायांच्या काळात खान मोठी फौज घेऊन आला होता. अफझल खान शिवरायांना उंदीर म्हटला होता... काल कुणीतरी बोलला... शिवरायांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता...  
* 34 जागांसाठी युती तोडली... आमच्या लढण्यासाठी कार्यकर्ते नाहीत काय?
* नरेंद्र मोदींबाबत माझ्या मनात द्वेष नाही...
* महाराष्ट्राचे तुकडे करण्याची स्वप्न तुम्ही पाहताय... पण, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही...
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.