'शाहरुख- आमिर घाबरले'

शाहरुख खान आणि आमिरला आता कोणत्याही मुद्द्यावर बोलायला भीती वाटत असेल,

Updated: Feb 4, 2016, 07:34 PM IST
'शाहरुख- आमिर घाबरले' title=

मुंबई: शाहरुख खान आणि आमिरला आता कोणत्याही मुद्द्यावर बोलायला भीती वाटत असेल, कारण त्यांनी केलेल्या वक्तव्यावर नकारात्मक प्रतिक्रिया येतात. असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरनं केलं आहे. 

कोणत्याही व्यक्तीनं केलेलं वक्तव्य आपल्या विरोधात असेल तरी त्याचा आपण आदर केला पाहिजे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असंही सोनम म्हणाली आहे. 

सोनमचा आगामी चित्रपट 'निरजा'चं गाणं 'अख्खीयाँ मिलायेंगे डर से'चं लॉन्चिंग करण्यात आलं, त्यावेळी तिनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

 

शाहरुखनं असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात निदर्शनं झाली, तसंच त्याचा दिलवाले हा चित्रपटाचं स्क्रिनिंगही काही ठिकाणी बंद करण्यात आलं. तर आमिरनंही त्याच्या बायकोला देशातल्या काही घटना बघितल्यावर देश सोडून जावसं वाटतं असं वक्तव्य केलं होतं.