'प्रत्युषा तणावाखाली असल्याचं वाटलं नाही'

मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप तरी उकललेले नाही. तिच्या आत्महत्येविषयी विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारण पुढे आलेले नाही.

Updated: Apr 3, 2016, 11:02 AM IST
'प्रत्युषा तणावाखाली असल्याचं वाटलं नाही' title=

मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप तरी उकललेले नाही. तिच्या आत्महत्येविषयी विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारण पुढे आलेले नाही.

काहींच्या मते प्रत्युषाचं तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्यासोबत भांडण झालं होतं. त्याच्यासोबतच्या नात्यात आलेल्या अपयशामुळे प्रत्युषा मनाने खचली होती. पोलीस सध्या त्या दिशेने तपास करत आहेत. प्रत्युषा आणि राहुल या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

तर काहींच्या मते तिच्या करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे तिला वाईट वाटत होतं. सध्या तिच्याकडे फारसं काही काम नव्हतं. यामुळेच तिला मानसिक त्रास होत होता. हे कारण कितपत खरं आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

पण, तिच्या एका मैत्रिणीच्या मते मात्र प्रत्युषावर कसलंही मानसिक दडपण होतं असं वाटत नाहीत. कारण, आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री म्हणजे गुरुवारी रात्री उशीरापर्यंत प्रत्युषाने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावून पार्टी केली होती. तसा जबाबही तिने पोलिसांकडे नोंदवला आहे.