एका फोन कॉलने बदललं या सुंदर तरुणीचं जीवन

असं म्हणतात की कधी कोणाचं नशीब उघडेल सांगता येत नाही. जीवनात एखादं वळण असं असतं की ते संपूर्ण जीवन बदलून टाकतं. एका तरुणीच्या बाबतीत ही असंच घडलं आहे.

Updated: Mar 13, 2016, 11:20 AM IST
एका फोन कॉलने बदललं या सुंदर तरुणीचं जीवन title=

मुंबई : असं म्हणतात की कधी कोणाचं नशीब उघडेल सांगता येत नाही. जीवनात एखादं वळण असं असतं की ते संपूर्ण जीवन बदलून टाकतं. एका तरुणीच्या बाबतीत ही असंच घडलं आहे.

एका फोन कॉलमुळे एका सुंदर तरुणीचं लाईफच चेंज झालं. ही तरुणी आहे अभिनेत्री ईशा रिक्खी. हिच्या करिअरला सुरुवात झाली ती बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत. जेव्हा ती मुंबईला आली तर तिला एका दिवशी अचानक एक फोन आला आणि तिला अॅड करण्याची ऑफर देण्यात आली.

ही अॅड तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत करायची होती त्यामुळे ती खूप मोठी गोष्ट होती. शूट दरम्यान ती खूपच घाबरलेली होती. मग डायरेक्टरने तिला आरशासमोर उभा राहून बोलण्यासाठी सांगितलं. या अॅडचं शुटींग पूर्ण झाल्यानंतर तिच्यासाठी अमिताभ यांनी देखील टाळी वाजवली. यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि ती जीवनात आणखी पुढे गेली.