पुढील ६८ दिवसपर्यंत जगाला सावधानतेचा इशारा, २० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता

 ज्योतिष विज्ञानानुसार जग सध्या खूप अमंगलकारी दिशेकडे पुढे जात आहे. येणाऱ्या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षांना सामोरे जावे लागणार आहे. 

Updated: Apr 18, 2016, 07:12 PM IST
 पुढील ६८ दिवसपर्यंत जगाला सावधानतेचा इशारा, २० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता title=

नवी दिल्ली :  ज्योतिष विज्ञानानुसार जग सध्या खूप अमंगलकारी दिशेकडे पुढे जात आहे. येणाऱ्या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती आणि संघर्षांना सामोरे जावे लागणार आहे. 

मंगळ आणि शनीची उलटी चाल जगात त्सुनामी आणि भूकंपाचा धोका आहे. एकत्र सहा ग्रहा उलटी दशा सुरू झाली आहे. त्यामुळे जगात समस्या वाढवत आहे. 

ज्योतिष विज्ञान आणि खगोल शास्त्रानुसार २० एप्रिलपासून २६ जून दरम्यान अघटीत घडण्याची शक्यता आहे. भारतासह जगातील मोठ्या भागात भूकंप, युद्ध, महामारी आणि विनाश होण्याची शक्यता आहे. ग्रहांचा असा योग बनतो आहे की त्याचा मानवी जीवनावर परिणाम होऊ शकतो. 

ज्योतिषांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार जगासाठी २० एप्रिलपासून पुढील ६८ दिवस सुरू होणार आहे.