उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 29, 2014, 12:57 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लखनऊ
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्याक आलीय. उसैत पोलीस स्टेशन अंतर्गत कटरा गावातील ही घटना आहे. गावातील 14 आणि 15 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींचा मृतदेह बुधवारी गावाजवळील एका झाडाला लटकलेलं आढळलं. दोघी जणी मंगळवारी संध्याकाळी उशीरा शौचालयाला जाण्यास निघाल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. मुलींच्या कुटुंबियांनी गावातीलच पप्पू, अवधेश आणि बृजेश यांच्यावर गँगरेपनंतर हत्येचा आरोप लावलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक मान सिंह चौहाननं गुरूवारी सांगितलं की, चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आलीय. सिंह यांनी सांगितलं की, पीडितांच्या कुटुंबियांनी घटना घडताच उसैत पोलीस स्टेशनचे अधिकारी छत्रपाल सिंह आणि सर्वेश कुमार यांना माहिती दिली. मात्र त्यांनी कारवाई केली नाही.
सिंह यांनी सांगितलं, दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. सध्या चौकशी सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.