जवानांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने बनवली दहशदवांद्याची टीम

एकीकडे पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्याची गोष्ट बोलतो आणि दुसरीकडे भारतीय जवानांना मारण्यासाठी योजना देखील आखतो. भारतीय जवानांना मारण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांची एक टीम तयार करत आहे.

Updated: Oct 4, 2016, 12:10 PM IST
जवानांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने बनवली दहशदवांद्याची टीम title=

नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्याची गोष्ट बोलतो आणि दुसरीकडे भारतीय जवानांना मारण्यासाठी योजना देखील आखतो. भारतीय जवानांना मारण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांची एक टीम तयार करत आहे.

जवानांना मारण्याची योजना आखत पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहेत. सीमाभागात या दहशतवाद्यांना सक्रिय करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतोय. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानची मदत करणारे लोकं देखील या योजनेत आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार २०१४ आणि २०१५ मध्ये काश्मीर खोऱ्यात हिंसाच्या घटना वाढल्या आहेत. बारामुलामध्ये ज्यांनी तिंरगा फडकवला त्यांना लक्ष्य करण्याच्या तयारीत दहशतवादी आहेत. हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी हे बारामुला जिल्ह्यात हल्ल्याची योजना आखत आहेत. कुपवाडा आणि बारामुल्लामध्ये सर्वाधिक दहशतवादी सक्रिय असल्याचं समोर येतंय.

मल्टी-एजेंसी सेंटरच्या ताज्या माहितीनुसार बांदीपूर, पुलवामा, बारामूला आणि अनंतनाग येथे लष्कराचे कॅम्प हे दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहेत. मागील आठवड्यात भारताने पीओकेमध्ये ज्या भागात सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्याचा देखील उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. भारतातील काही भागांमधून देखील दहशतवादी हे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेण्याचं काम देखील लष्कराकडून होत आहे तर भारतीय नागरिकांनी देखील संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना कळवण्याची गरज आज आहे.