सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान बधीर!

सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची सध्याची अवस्था म्हणजे भूल दिलेल्या रुग्णासारखी झाली आहे, असा टोला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लगावला आहे. 

Updated: Oct 1, 2016, 08:40 PM IST
सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान बधीर! title=

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची सध्याची अवस्था म्हणजे भूल दिलेल्या रुग्णासारखी झाली आहे, असा टोला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लगावला आहे.

ऑपरेशन करताना रुग्णाला भूल दिली जाते. भूल दिल्यानंतर रुग्णाला आपलं ऑपरेशन झालं आहे तेच कळत नाही, पाकिस्तानची सध्याची अवस्था तशीच आहे. दोन दिवसानंतरही त्यांना काय झालं हे कळत नाहीये, असा टोलाही पर्रिकरांनी लगावला आहे.

पर्रिकर यांनी भारतीय लष्कराची तुलना हनुमानाबरोबर केली आहे. जसा हनुमान समुद्रापलीकडे गेला, तशीच आपलं लष्कर सीमेपलीकडे गेल्याचं पर्रिकर म्हणाले. संरक्षण मंत्र्यांनी भारतीय लष्कराचं तोंडभरून कौतूक केलं.

पाहा पर्रिकर यांची फटकेबाजी