"पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही"

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकऱयांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

Updated: May 18, 2015, 10:39 PM IST
"पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही" title=

अमेठी : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी येथील फूड पार्कचा मुद्दा सोमवारी पुन्हा एकदा उचलून धरला. मोदी सरकार 'सुडाचे राजकारण' करत असल्याचा पुनरुच्चार करत फूड पार्कला विरोध म्हणजे शेतकऱयांना विरोध हा मूळ मुद्दा सरकारने ध्यानी घ्यावा, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

परदेश दौरे करणाऱया पंतप्रधान मोदींना देशातील शेतकऱयांना भेटण्यासाठी वेळ नाही. पंतप्रधानांनी अद्याप एकाही शेतकरी कुटुंबाची भेट घेतली नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
राहुल सध्या अमेठी या आपल्या मतदार संघात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱयांची भेट घेत आहेत. यावेळी राहुल म्हणाले की, "सतत परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांच्या घरी कधी आले नाहीत. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांकडून फूड पार्क हिसकावून घेतले. फूड पार्कला विरोध करून भाजप माझ्याशी सूडाचे राजकारण करू पाहत आहे पण, याचा फटका शेतकऱयांना बसत आहे. अमेठीमध्ये फूड पार्क झाल्यास अमेठीबरोबरच आसपासच्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार होता."

देशातील शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांना हाताळण्यास एनडीए पूर्णपणे अपयशी ठरत असल्याने या सरकारला दहा पैकी शून्य गुण देऊ करत असल्याचेही राहुल म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.