दोन एक्सप्रेसमध्ये टक्कर, बारा जण ठार

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा रेल्वे अपघात झालाय. या अपघातात बरौनी एक्सप्रेस आणि कृषक एक्सप्रेसनं एकमेकांना समोरासमोर येऊन टक्कर दिलीय. 

Updated: Oct 1, 2014, 11:22 AM IST
दोन एक्सप्रेसमध्ये टक्कर, बारा जण ठार title=

गोरखपूर : उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा रेल्वे अपघात झालाय. या अपघातात बरौनी एक्सप्रेस आणि कृषक एक्सप्रेसनं एकमेकांना समोरासमोर येऊन टक्कर दिलीय. 

हा अपघात गोरखपूरच्या नंदनगरमध्ये घडलाय. दोन ट्रेनमध्ये जोरदार टक्कर झाल्यानं बरौनी एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ४५ लोक जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोकांना वाचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली आहे.  

राज्य सरकारनं जखमींना ५० हजार आणि मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची घोषणा केलीय. अंधार असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता.

जखमींना तत्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. कृषक एक्सप्रेस वाराणसीहून गोरखपूरमार्गे गोंडाला जाते प्रवास करत होती तर बरौनी एक्सप्रेस लखनऊहून गोरखपूरमार्गे बरौनी जाते.   
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.