दिल्लीतील तिढा सुटणार, काँग्रेसला 'आप'च्या मागण्या मान्य

दिल्लीत सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असतानाच काँग्रेसनं आम आदमी पार्टीला सकारात्मक उत्तर पाठवत १८ मागण्या मान्य असल्याचं म्हटलय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 17, 2013, 10:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असतानाच काँग्रेसनं आम आदमी पार्टीला सकारात्मक उत्तर पाठवत १८ मागण्या मान्य असल्याचं म्हटलय.
अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना कांग्रेसनं यातील १६ मुद्दे हे प्रशासकीय असल्याचं म्हटलय. तर इतर दोन मुद्दे काँग्रेसनं मान्य केले आहेत. सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झालेला असताना, समर्थनासाठी केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपला १८ मुद्द्यांवर उत्तर मागितलं होतं. या पत्राला भाजपनं उत्तर दिलं नाही, मात्र काँग्रेसनं आम आदमी पार्टीचे १८ मुद्दे मान्य केले आहेत.
काँग्रेसने पाठवलेल्या पत्रावर आम आदमी पार्टीच्या मुख्य नेत्यांची बैठकही पार पडली. या बैठकीनंतर उद्या जनतेतच काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती कुमार विश्वास यांनी दिली आहे. दुसरीकडे दिल्लीच्या उपराज्यपालांनी विधानसभा निलंबित करुन, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.