आता मुस्लिम धर्मगुरू आमिर खानवर भडकले

लखनऊ : आमिर खानने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता त्याच्यामागचं शुक्लकाष्ठ संपण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीये.

Updated: Feb 2, 2016, 04:15 PM IST
आता मुस्लिम धर्मगुरू आमिर खानवर भडकले title=

लखनऊ : आमिर खानने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता त्याच्यामागचं शुक्लकाष्ठ संपण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीये. कारण, मोदी समर्थकांनतर काही मुस्लिम धर्मगुरू त्याच्या या वक्तव्याचा समाचार घेत आहेत. 

शिया मुस्लिम धर्मगुरू कल्वे जव्वाद यांनी आता आमिरवर टीका केली आहे. आमिरचं हे असं बोलणं निंदनीय आहे, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की देशात कुठेही असहिष्णुतेचं वातावरण दिसत नाही. 

जव्वाद यांच्या मते देशात अनेक धर्मांचे समुदाय आनंदाने एकमेकांसोबत नांदत आहेत. भारत देश जगातील मुसलमानांसाठी जगातील सर्वोत्तम जागा आहे आणि इथे प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार राहण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही ते म्हणाले. 

पठाणकोट हल्ल्यांसारखे हल्ले रोखणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव यांच्यावरही टीका केलीये. अखिलेश यांच्या काळात राज्यात लूटमार, खून यांसारख्या घटना वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.