रात्री अंघोळ केल्याने होतात हे पाच फायदे

दिवसभराचा थकव्यानंतर रात्री चांगली झोप गरजेची आहे. पण अनेकवेळा अधिक थकव्यानंतर झोपेत अडथळा निर्माण होते. अशात रात्री अंघोळ केल्याने तुमच्या झोपेला अधिक चांगली करण्यात मदत होते. 

Updated: Dec 15, 2015, 05:54 PM IST
रात्री अंघोळ केल्याने होतात हे पाच फायदे  title=

मुंबई : दिवसभराचा थकव्यानंतर रात्री चांगली झोप गरजेची आहे. पण अनेकवेळा अधिक थकव्यानंतर झोपेत अडथळा निर्माण होते. अशात रात्री अंघोळ केल्याने तुमच्या झोपेला अधिक चांगली करण्यात मदत होते. 

१) थंड आणि गरम पाण्याने अंधोळ 

गरम पाण्याने अंधोळ केल्यानंतर रक्त संचार प्रथम उत्तेजित होतो, पण काही वेळातच तो मंद पडतो. पण थंड पाण्याने अंधोळ केल्याने रक्त संचार प्रथम मंद पडतो आणि नंतर उत्तेजीत होतो, हे लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार थंड पाणी मेंदूला थंड करण्यात मदत करतो. आपल्या दिवसाची सुरूवात थंड पाण्याने झाल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जातो. या शिवाय शारीरिक सौंदर्य टीकून राहते. 

२) चांगली झोप 
रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होतो. तुम्हांला चांगली झोप लागतो. अंघोळीच्या पाण्यात इसेंस ऑईल वापरल्यास झोप अजून चांगली येते. तसेच तुम्हांला एका वेगळ्या शांतीचा अनुभव येईल. झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केली तर शरिराचे तापमान योग्य राहते. त्यामुळे चांगली झोप येते. गर्म पाणी तुमच्या मसल्सला आराम देते. 

३) चरबी कमी होते
आपल्या शरिरात दोन प्रकारे फॅट असतात. व्हाईट फॅट हे आपल्या शरिरासाठी घातक असते. दुसरे ब्राऊन फॅट आपल्या शरिरासाठी चांगले असते. आपल्या भोजनातून तयार होते. ते व्हाइट फॅट असते. हे फॅट आपल्या शरिराच्या एका भागात गोळा होता. एक्पर्टने सांगितल्यानुसार आपण थंड आणि गरम पाण्याने अंघोळ केल्यावर कॅलरी बर्न होतात. त्यामुळे आपले वजन आणि चरबी कमी होते. 

४) त्वचामध्ये चमक येते 
स्किन एक्सपर्टनुसार थंड पाण्याने अंघोळे केल्यावर केस चांगले होतात आणि त्वाच चमकदार होते. तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होत नाही. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. गरम पाण्याने आपल्या त्वचेचे रोमछिद्र ओपन होता. 

५) इम्युनिटी लेव्हल वाढते 
थंड पाण्याने तुमची इम्युनिटी अधिक स्ट्राँग होते. थंड पाण्याने अंघोळ केल्यावर इम्युनिटी लेवल अजून वाढण्यातही मदत होते. थंड पाण्याने रक्त पुरवठा चांगला होता. इम्युनिटी लेव्हल वाढल्याने शरिरातील व्हाईट सेल्स वाढतात. अनेक आजाराशी लढण्यासाठी व्हाइट सेल्स मदत करतात. त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडतात.