गुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2014, 08:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.
गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो, पण हाच गुजराती समाज महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच पुढे आला नाही, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजराती समाजाला फैलावर घेतले. आधी दक्षिण भारतीय आणि नंतर उत्तर भारतीयांवर टीका करणाऱ्या शिवसेनेने आता थेट गुजराती समाजावर टीका केली आहे.
गुजराती व्यापारी समाजाने शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एकत्र यावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी `सामना`मधील संपादकीयमधून गुजराती समाजाला केले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लिहिलेल्या अग्रलेखात उद्धव ठाकरे म्हणतात, `महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी आपला जीव दिला. यानंतरच महाराष्ट्र राज्याची निर्मीती करण्यात आली. पण या गोष्टीच मराठी व्यतिरीक्त इतर सामाजाला काहीच घेण देण नसतं.`
काय म्हणालेत उद्धव, पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.