शिक्षणाचा खेळखंडोबा आणि राजकीय आखाडा

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासन कारभारात एक पेपरफुटीचा प्रकार घडला आणि सा-याच कारभारावर आज राजकारणी बोट ठेवायला सुरुवात झालीय.. खरतर यानिमित्तानं सुरु असलेली कुलगुरु हटाव मोहीम जरा वेगातच झाली.. पण कुलगुरु हटाव मोहीमेला विद्यापीठाच्या बाहेरच्या राजकारणापेक्षा हा अंतर्गत राजकारणाचा खेळ जास्त आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे साडेसहाशे महाविद्यालये येतात. आणि या विद्यापीठाअंतर्गत साडेसहा लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात.. आज आरोप प्रत्यारोपापेक्षा विद्यापीठाला गरज आहे ती ख-या सक्षम प्रशासकीय धोरणाची.

Updated: Apr 5, 2012, 11:03 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

 

मुंबई विद्यापीठात झालेल्या पेपरफुटीवरुन आता कुलगुरुंचे निलंबन करा यासाठी आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झ़डू लागल्यायतं..का फुटले पेपर, का झाली सिनेटच्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई, काय आहे विद्यापीठाची भूमिका? याची सडेतोड चर्चा केली आहे, शिक्षणाचा खेळखंडोबामध्ये.

 

 

कुठल्यातरी एका कॉलेजमध्ये पेपर फुटतो आणि त्यासाठी थेट कुलगुरुनाच जबाबदार धरलं जात आहे.  मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरुन युवासेना आक्रमक झालीय. तर कुलगुरुंनीही आपण राजीनामा देणार नसल्याचं जाहीर केलंय.. सिनेटच्या सदस्य़ांवर निलंबनाची कारवाई झाली आणि शिवसेनेनं थेट कुलगुरुंच्या निलंबनासाठी राज्यपालांची भेट घेतली. विधानसभेत चांगलाच गोंधळही घातला गेला पण विद्यापीठांच्या समस्यांवर किती नेत्यानी सभागृहात आवाज उठवला यांचं उत्तर नकारार्थीच मिळत.

 

 

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासन कारभारात एक पेपरफुटीचा प्रकार घडला आणि सा-याच कारभारावर आज राजकारणी बोट ठेवायला सुरुवात झालीय.. खरतर यानिमित्तानं सुरु असलेली कुलगुरु हटाव मोहीम जरा वेगातच झाली.. पण कुलगुरु हटाव मोहीमेला विद्यापीठाच्या बाहेरच्या राजकारणापेक्षा हा अंतर्गत राजकारणाचा खेळ जास्त आहे.  मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे साडेसहाशे महाविद्यालये येतात. आणि या विद्यापीठाअंतर्गत साडेसहा लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात.. आज आरोप प्रत्यारोपापेक्षा विद्यापीठाला गरज आहे ती ख-या सक्षम प्रशासकीय धोरणाची.. युवा सेनेच्या आंदोलनानंतर विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर आता रिक्त पदं तातडीनं भरण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

 

 

आज सर्वच राजकीय संघटना जरी थेट राजीनाम्याची भाषा करत असले तरी विद्यापीठासमोरची आव्हान समजून घेण्याचा प्रयत्न राजकारण्यानी करण गरजेचं बनलय.मुंबई विद्यापीठाचा आवाका मोठा आहे.. काही लाख विद्यार्थ्याची शिक्षणाची जबाबदारी असण्याबरोबरच विद्यापीठाचा असलेला वारसा आणि दर्जा सांभाळणही महत्वाचं आहे. विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं विद्यापीठासाठी निधी आणि निती ठरवण्याची गरज  शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  युवासेनेसाठी शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेली राज्यपालाच्या भेट असो वा कुलगुरुनी घेतलेली मंत्र्याची भेट असो... एकूणच विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी यावेळेस खरी गरज आहे ती राजकारणाची नाही तर सरकारच्या सक्षम धोरणाची.

 

 

 

भिवंडीत एक पेपरबॉम्ब फुटला आणि आता त्याची दाहकता सर्वच टिवाय बीक़ॉमच्या विद्यार्थ्याना सहन करावी लागतेय. पेपरफुटीवरुन राजकारण पेटलयं, कुलगूरु हटाव मोहीम सुरु झाली...पण ज्याच्यासाठी हे सारं केलं त्या टिवायबीकॉमच्या विद्यार्थ्याना मात्र ह्युमन रिसोर्सचा पेपर पुन्हा द्यावा लागणार हे आता जवळपास  नक्की झालं आहे.

 

 

समृद्ध शैक्षणिक वारसा असं म्हणत ज्या विद्यापीठाकडे पाहिलं जायचं, त्याच विद्यापीठाच्या आवारात राजकारण शिरलं आणि समृद्ध शैक्षणिक परंपरेला आज घडत असलेल्या वादळी घडामोडीनी वादाच्या भोव-यात फेकलंय.. केवळ एका कॉलेजची चुक आज सर्वच टिवायबीकॉमच्या विद्यार्थ्याना सहन करावी लागतेय. ज्यानी उत्तर द्यायची त्यानी माफ करा अशी भाषा सुरु केलीय.. पण पुन्हा पेपरला सामोरं जायचंय त्या 85 हजार विद्यार्थ्यांची चूक काय या प्रश्नाचं उत्तर चौकशी समितीचं उत्तर देणार असं म्हणत वेळ टाळण्याचे आटेकोट प्रयत्न केले जातायत.. एका कॉलेजमध्ये पेपर फुटला पण सरसकट न्याय या नात्यानं फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय लादण्यात आला.

 

 

यावर विद्यार्थ्यानी विद्यापिठाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान